Description
अरविद आणि अरबाज या सारख्यासारख्याच दोन ‘व्यापाऱ्यांच्या’आयुष्यातील चढउतार. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात वरचढ ठरण्यासाठी ते जगातला प्रत्येक नियम मोडत भयावह आणि घातक योजना आखतात. आणि त्यांची इच्छा नसूनही त्यांची आयुष्यं त्यांना पुन्हापुन्हा एकमेकांसमोर आणून उभी करतात. कथेचे धागे अत्यंतकुशलतेने गुंफणारे निष्णात कथाकार अश्विन सांघी पुन्हा एकदा भूतकाल आणि वर्तमानाचे, वास्तव आणि कल्पनेचे, इतिहास आणि दंतकथेचे,व्यवसाय आणि राजकारणाचे,प्रेम आणि द्वेषाचे धागे एकत्र गुंफत आहेत. अनेक पातळ्यांवर घडणाऱ्या घटना असणाऱ्या या चित्तथरारक गोष्टीत ते तुम्हाला उत्कंठेच्या कड्याच्या टोकावर सतत झुलवत ठेवतात आणि तिच्या अनपेक्षित शेवटाचा तुम्ही फक्त अंदाज बांधत राहता.
अरविद आणि अरबाज या सारख्यासारख्याच दोन ‘व्यापाऱ्यांच्या’आयुष्यातील चढउतार. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात वरचढ ठरण्यासाठी ते जगातला प्रत्येक नियम मोडत भयावह आणि घातक योजना आखतात. आणि त्यांची इच्छा नसूनही त्यांची आयुष्यं त्यांना पुन्हापुन्हा एकमेकांसमोर आणून उभी करतात. कथेचे धागे अत्यंतकुशलतेने गुंफणारे निष्णात कथाकार अश्विन सांघी पुन्हा एकदा भूतकाल आणि वर्तमानाचे, वास्तव आणि कल्पनेचे, इतिहास आणि दंतकथेचे,व्यवसाय आणि राजकारणाचे,प्रेम आणि द्वेषाचे धागे एकत्र गुंफत आहेत. अनेक पातळ्यांवर घडणाऱ्या घटना असणाऱ्या या चित्तथरारक गोष्टीत ते तुम्हाला उत्कंठेच्या कड्याच्या टोकावर सतत झुलवत ठेवतात आणि तिच्या अनपेक्षित शेवटाचा तुम्ही फक्त अंदाज बांधत राहता.